#आठवणी_नागपूरच्या .....
नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपवून काल 16 दिवसानंतर गावी म्हणजे परळीला परतलो.... 36 तास उलटले, तरीही मन नागपूरच्या आठवणीतच आहे... अन जिभेवर सावजीची चव रेंगाळते आहे..... 7 वर्षांपासून दरवर्षी नागपूरला जातोय..परळीनंतर सगळ्यात जास्त आवडलेलं शहर कोणतं असेल तर ते म्हणजे नागपूर.... इथले लोक खऱ्या अर्थाने आयुष्य जगतायत..... इथली खाद्यसंस्कृती तर लाजवाब.....सावजी, वांग्याचं भरीत, पाटोड्यांची भाजी, संत्री अन त्याच जूस, संत्रा बर्फी..... गोळाभात आणि विशेष म्हणजे खव्याच्या पोळीसारखी गोड माणसं....
नागपूरची गुलाबी थंडी, स्वच्छता, भव्य रस्ते,
ट्रॅफिकची नसेलली दगदग, आणि निवांतपणा हे हि काही वैशिष्ठे... नागपूरचे मित्र अन मैत्रिणी तर लय भारी 


.....सकाळी गुलाबी थंडीत morning वॉक, त्या नंतर आयुर्वेदीक काढा, फ्रुट juice चा आस्वाद, सकाळी मस्त नास्ता, दिवसभर भृरकाम आणि रात्री सावजी with जाम
.... असा माझा दिनक्रम....मजा आ गया.....
मॉर्निंग walk ला मोठे इथे एक मोठे वन उद्यान आहे, या ठिकाणी रोज 10 एक हजार लोक येत असतील. इथे रोज कोणाचा ना कोणाचा birthday साजरा केला जातो, आपल्याच मित्राचा bday आहे असं समजून घुसायच, भरपेट नास्ता करायचा अन निघताना शुभेच्छा एक सेल्फी काढून त्याला खुश करायचं असा हि नित्य क्रम होता....एक दिवस wine महोत्सव...एक दिवस movie ...कधी व-हाडी थाट तर कधीएखादा बार....कधी राहुल देशपांडेंची मैफिल तर कधी वसंतराव देशपांडे सभागृहातील सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी....रात्री उशिरा पर्यंत शेकोटी समोरची अंताक्षरी..... असं रोज काही तरी नवं नवीन असायचं....नागपूर मध्ये तस पाहण्यासाठी , फिरण्यासाठी काही खास नाही...तरीही नागपूर खास आहे....झपाट्याने बदलत आहे...म्हणूनच नागपूर खास आहे....
पुढचे वर्ष भर हे सगळं मिस करणार....!!!
आता पुन्हा रोजची दगदग..कल्पनेनेच पोटात गोळा आलाय...
मनात आठवणी मात्र वर्षभर पुरतील इतक्या आहेत

अती सुंदर
ReplyDeleteखुप छान लिहिलंय pj
ReplyDeleteNice sir
ReplyDelete